ठाणे -: राज्यात करोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरू आहे. करोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरीक करत आहे,
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता करफ्यु व लाॅक डाउन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम आम्हा दिव्यांग बांधवांवर होत आहे. आमचे जिवन पूर्णपणे उध्वस्त होत आले असून याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण वरील *संदर्भीय पत्र क्र. १* नुसार सर्व विभागीय आयुक्तांना दिव्यांग व्यक्तींना एक महिना पुरेल एवढे जीवनावश्यक वस्तूंचे जसे *धान्य, कडधान्य, डाळी, तेल, तांदूळ* इत्यादी वस्तूंचे वाटप करण्याचे स्पष्ट आदेश संबंधितांना देण्यात आलेले होते,,,परंतु सदर आदेशात *मोफत* हा शब्दाचा उल्लेख नसल्यामुळे संबंधित विभागाने आपण दिलेल्या आदेशाचा सोईनुसार अर्थ लावून *दिव्यांग व्यक्तींना हे सर्व साहित्य पैसे आकारून पुरवले जात असून* फक्त सदर साहित्य *दुकानातून आणून देण्याची सेवा* प्रदान केली जात आहे याची नोंद असावी,
*ठाणे मनपा हद्दीतील* ♿दिव्यांग व्यक्ती सध्या उपासमारीचे जीवन जगत असून भविष्यात अशीच परिस्थिती कायम राहिल्यास *भूकबळी* जाण्यापासून कोणीच रोखू शकत नसल्यामुळे आपण पुन्हा सर्व जिल्हापरिषद, नगरपालिका, जिल्हाधिकारी यांना स्पष्ट लेखी आदेश देऊन आम्हां *दिव्यांगांचे जीवन वाचवावे* ही पुन्हा विनंती करण्यात आली आहे.