मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी लॉक डाऊनची महत्वपूर्ण घोषणा केली असून महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे.
महाराष्ट्रात रूग्णांची संख्या वाढतच असून आपल्याला महाराष्ट्रातून कोरोनाला संपूर्णपणे हद्दपार करावयाचे आहे. जीवनावश्यक सेवा व कृषी विषयक सेवा पूर्णपणे सुरू राहणार असून आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने या संकटाचा मोठ्या हिंमतीने सामना केला आहे.
आज संपूर्ण जगावर व देशावर संकट आले असताना अशा परिस्थितीतही महाराष्ट्र सर्वांना दिशा दाखवण्याचे काम करणार आहे. त्यामुळे यापुढेही जनतेने सहकार्य करून कुठेही गोंधळ न करता कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हातभार लावावा. कोरोना विषाणूच्या चैनला म्हणजेच साखळदंडाला तोडण्याचे धैर्य आपणाला दाखवायचे आहे. त्यामुळे नाईलाजाने किमान 30 एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली.
महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे.