६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी २५ लाख ठाणेकर वेठीला.

 


६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी २५ लाख ठाणेकर वेठीला.
ठाणे :- ठाणे महापालिकेनं अर्थसंकल्पात पाणी पुरवठ्याच्या दरात ५० टक्के वाढ सुचवली आहे. झोपडपट्टी वासियांकडून १३० ऐवजी २०० तर सदनिका धारकांकडून ३१५ ते ३४५ रूपये आकारले जाणार आहेत. केवळ ६५ कोटी रूपयांच्या जादा उत्पन्नासाठी महापालिकेकडून २५ लाख ठाणेकरांना वेठीला धरू दिले जाणार नाही असा इशारा भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नारायण पवार यांनी दिला आहे. 


दरवाढ प्रस्तावित करताना ४० टक्के पाणी गळतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याबद्दल नारायण पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प हा ३ हजार ७८० कोटींपर्यंत पोहचला आहे. त्यामध्ये ६५ कोटी रूपये ही नगण्य रक्कम आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेनं तांत्रिक सल्लागारावर कोट्यावधी रूपये खर्च केले पण त्यातील अनेक प्रकल्पांची वीटही रचली गेली नाही. अशा परिस्थितीत ६५ कोटी रूपयांच्या उत्पन्नासाठी ठाणेकरांना वेठीस धरू दिले जाणार नाही असा इशारा नारायण पवार यांनी दिला आहे.



Popular posts
नाशिक जिल्हापोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले चिमुकल्या गार्गीची भेट घेऊन कौतुक.
Image
माझा सभासद माझी जबाबदारी.
Image
ठाण्यात उद्यापासून जेष्ठ नागरिकांसाठी 'ड्राईव्ह ईन' लसीकरण सुविधा सुरू फक्त नोंदणीकृत जेष्ठ नागरिकांनाच दुसरा डोस घेता येणार.
Image
छ.शिवाजी महाराज चौक कळवा ते खोपट, तीनहात नाका मार्गे मुलुंड चेकनाका* ठाणे परिवहन बस फेऱ्यात वाढ- विजय देसाई
Image
*रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग* *‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना* _पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू_*
Image